अहमदनगर

नगर : 900 किलो गोमांस जप्त, 4 जनावरे मुक्त

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने शिबलापूर रस्त्यावर केलेल्या कारवाईत तब्बल 1 टन गोवंशाचे मांस हस्तगत केले तर दुसर्‍या कारवाईत पुणे- नाशिक महामार्गावर हॉटेल सम्राटजवळ पोलिसांनी पकडलेल्या टेम्पोतून कत्तलीस नेणार्‍या 6 गोवंश जनावरांची मुक्तता केली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही घटनेत सुमारे सव्वाआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन, चार जणांना अटक केली आहे. संगमनेर शहरातील देवगाव फाट्यावरून शिबलापुरकडे जाणार्‍या रस्त्यावर गाडीमध्ये गोवंश जनावरांचे कत्तल केलेले गोमांस जात असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत गुप्त माहिती पो. नि. राजेंद्र भोसले यांना समजली. त्यांनी पोलिस पथकास कारवाईच्या सूचना दिल्या.

पोलिस पथकाने संगमनेर-शिबलापूर रस्त्यावर शेतकी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सापळा लावला. यावेळी संगमनेरकडून येणार्‍या पांढर्‍या रंगाच्या पिकअप वाहन चालकास पोलिसांनी थांबविले. तपासणी केली असता पिकअपमध्ये 900 किलो गोवंशाचे कत्तल केलेले गोमांस आढळले. पोलिसांनी पिकअप जप्त केला. याप्रकरणी पो. ह. सुरेश गोलवड यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन मुळच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील मात्र गोवंशाच्या कत्तलीकरीता संगमनेरात स्थायिक झालेला हलीम यूसुफ कुरेशी (रा.भारतनगर) याच्यावर महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यासह प्राणीसंरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन, त्याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 900 किलो गोवंश मांस, 2 लाख रुपये किंमतीचा महिंद्रा पिकअप असा एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दुसर्‍या घटनेत घुलेवाडी शिवारातील हॉटेल सम्राटजवळ सापळा लावून नाशिकहून संगमनेरकडे येणारा संशयित टेम्पो पोलिसांनी थांबवून तपासणी केली. टेम्पोत पोलिसांना कत्तलीच्या हेतूने अतिशय निर्दयपणे बांधलेली 6 गोवंश वासरे आढळली. याप्रकरणी पो. ह. भास्कर पिचड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी इरफान नूर कुरेशी रा. वडाळा नाका नाशिक), जावेद सुलतान कुरेशी व जाकीर बशीर शहा (दोघेही रा. वडाळागाव, ता. नाशिक) या तिघांवर प्राणी संरक्षण कायद्यान्वये कोणा दाखल करुन, तिघांनाही अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 42 हजार रुपये किंमतीची 6 वासरे, 4 लाखाचा टेम्पो असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

निष्पाप गोवंश जनावरांच्या हत्या थांबत नाहीत !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून पोलिसांनी शेकडो वेळा छापे घालूनसुद्धा संगमनेरातील कत्तलखाने बंद होत नाहीत. संगमनेरात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा कत्तलखान्यातून सुरु असलेल्या निष्पाप गोवंश जनावरांच्या हत्या थांबत नाहीत, हे वास्तव सतत होणार्‍या कारवायावरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT