अहमदनगर

नगरमधून 550 हद्दपार ; प्रांताधिकार्‍यांचे आदेश

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 550 व्यक्तींना 29 सप्टेंबरपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आल्याचे आदेश नगर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी काढले आहेत.
गणेशोत्सव विसर्जन व ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर शांततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता ग्रहीत धरुन भिंगार, नगर तालुका, एमआयडीसी, तोफखाना व कोतवाली या पाच पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील 550 व्यक्तींना 144 (2) नुसार 26 सप्टेंबरपासून ते 29 सप्टेबरपर्यंत शहरात उपस्थित राहण्यास सक्तमनाई केली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी पाटील यांनी दिला आहे.

हद्दपारी कोठे किती
भिंगार : 125, नगर तालुका 28, एमआयडीसी : 88, तोफखाना 168, कोतवाली 141.

SCROLL FOR NEXT