Gram Panchayat Election Results : राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज मंगळवारी (दि.२०) जाहीर होत आहेत. रविवारी या निवडणुकीसाठी सुमारे ७४ टक्के मतदान झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपद तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे रविवारी प्रत्यक्षात ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. आता आज जाहीर होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे १३५, पालघर ६२, रायगड १९१, रत्नागिरी १६३, सिंधुदुर्ग २९१, नाशिक १८८, धुळे ११८, जळगाव १२२, अहमदनगर १९५, नंदुरबार ११७, पुणे १७६, सोलापूर १६९, सातारा २५९, सांगली ४१६, कोल्हापूर ४२९, औरंगाबाद २०८, बीड ६७१, नांदेड १६०, उस्मानाबाद १६५, परभणी ११९, जालना २५४, लातूर ३३८, हिंगोली ६१, अमरावती २५२, अकोला २६५, यवतमाळ ९३, बुलडाणा २६१, वाशीम २८०, नागपूर २३४, वर्धा १११, चंद्रपूर ५८, भंडारा ३०४, गोंदिया ३४५, गडचिरोली २५. एकूण ७ हजार १३५. (Gram Panchayat Election Results)
ग्रामपंचायतींसाठी चुरशीने झालेल्या मतदानानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. चौकाचौकांत रात्री जागू लागल्या आहेत. मंगळवारी (दि.२०) गुलाल कुणाला, याचा फैसला होत आहे. सकाळी १० वाजता पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
बहुतांशी गावांमध्ये अत्यंत अटी-तटीने निवडणूक पार पडली. सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत; तरीही अनपेक्षित निकालाचीही धाकधूक आहे. त्यामुळे उद्याच्या मतमोजणीकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदानानंतर अनेक उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरणार की अपेक्षाभंग होणार, हे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा :