अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या जुन्या 'भुल भुलय्या'ने मोठेच यश मिळवले होते. आता 'भुलभुलय्या-2'नेही बंपर यश मिळवले आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने गेल्या केवळ अकरा दिवसांमध्येच 128 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या चित्रपटाच्या यशाबद्दल देण्यात आलेल्या पार्टीत चित्रपटातील सर्व कलाकार सहभागी झाले होते; पण चित्रपटाची नायिका बनलेली कियारा अडवाणीच हजर नव्हती! त्यामुळे अर्थातच या गोष्टीची चर्चा सुरू झाली. पार्टीत कार्तिकसह तब्बू, राजपाल यादव, संजय मिश्रा यांनी धमाल केली. कियारा का आली नाही हे मात्र समजू शकले नाही. अर्थात तिला यानिमित्ताने आणखी एक हिट चित्रपट मिळाला असून कार्तिकच्या कारकिर्दीतीलही हा एक महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. कार्तिकचे गेल्या सहापैकी पाच चित्रपट हिट झालेले आहेत. यापूर्वी त्याचे 'धमाका', 'पती, पत्नी और वो', 'लुकाछुपी', 'सोनू के टीटू की स्वीटी' हे चित्रपट हिट झाले होते. आता 'भुलभुलय्या-2' हा पाचवा सॉलिड हिट चित्रपट ठरला आहे!