पुढारी ऑनलाईन : एकीकडे शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटावरून वाद सुरू असताना आता अभिनेत्री करिना कपूरने बॉयकॉट बॉलीवुड ट्रेडवर प्रतिक्रिया दिली आहे. मी त्याच्याशी सहमत नाही, असे म्हणत करिनाने काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत.
एका कार्यक्रमात करिना म्हणाली, जर असे घडले तर आम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन कसे करू शकणार ? तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह कसा अनुभवणार? माझ्या मते प्रत्येकाला आयुष्यात आनंद आणि उत्साहाची गरज असते. जर चित्रपटच नसतील तर मनोरंजन कसे होणार? करिनाची ही प्रतिक्रिया चर्चेत आहे.
'पठाण'मधील 'बेशर्म रंग' या गाण्यावर देशभरात वाद सुरू आहे. 'लाल सिंग चड्डा'च्या वेळीही करिनाने बॉयकॉटवर भाष्य केले होते. हा खूप सुंदर चित्रपट आहे. प्रेक्षकांनी मला आणि आमीरला स्क्रीनवर पाहावे, अशी माझी इच्छा आहे. यासाठी आम्ही खूप प्रतीक्षा केली. त्यामुळे कृपया त्याच्यावर बहिष्कार टाकू नका, असे ती म्हणाली.