Latest

चर्चा कॅटरिनाच्या सिनेमाचीच… सोनाक्षी, जान्हवी ठरल्या फ्लॉप

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड चित्रपटांचे 'अच्छे दिन कब आयेंगे' हा प्रश्न आता विचारला जातोय. कारण, बॉलीवूडचे तीन चित्रपट रीलिज झाले आहेत. त्यामध्ये एक कॅटरिना कैफचा, दुसरा सोनाक्षी सिन्हाचा आणि तिसरा जान्हवी कपूरचा. ही तिन्ही बॉलीवूडमधील मोठी नावे आहेत; मात्र या तिघींच्या चित्रपटाला ओपनिंग डेला धमाका करण्यात यश मिळाले नाही. कॅटरिनाचा चित्रपट सोडला, तर इतर दोन चित्रपटांना कोटीचा आकडा पार करण्यातही यश मिळाले नाही.

बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत असताना दक्षिणेकडील हिंदीत डब केलेले चित्रपट मात्र रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत आहेत. दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये असे नेमके काय आहे, जे आपल्या चित्रपटात नाही, याचा विचार करण्याची वेळ आता बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांवर आली आहे.

SCROLL FOR NEXT