Latest

मशिदीवरील भोंगे उतरविले जात नाहीत, तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरुच राहणार : राज ठाकरे

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील ११४० पैकी १३५ मशिदींवर आज (दि.४) पहाटे पाचची  अजाण झाली. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मनसे नेत्यांवर कारवाई का ? असा सवाल करत जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविले जात नाही, तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी  राज ठाकरे म्हणाले की, आज सकाळपासून महाराष्ट्रातील मनसे नेते, पदाधिकारी यांना पोलिसांचे फोन येऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या जात आहेत. परंतु आमच्यावरच कारवाई का केली जात आहे. मुंबईतील ११४० पैकी १३५ मशिदींवर आज पहाटे अजान झाली. त्यांच्यावर कारवाई होणार का ? असा सवालही त्‍यांनी केला. ९० टक्के ठिकाणी सकाळची अजाण झाली नाही.
मुंबईतील १००५ मशिदीवर भोंगे लागले नाहीत. त्या मशिदींतील मौलवींचे आभार मानतो, असेही त्‍यांनी नमूद केले.

भोंग्यांचा विषय धार्मिक नव्हे, तर सामाजिक

महाराष्ट्रातील  मशिदीवरील  अनधिकृत भोंगे उतरत नाहीत, तोपर्यंत मनसेचे हनुमान चालिसा आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. भोंग्यांचा धार्मिक नव्हे, तर सामाजिक विषय आहे. मशिदींना वर्षभरासाठी परवानगी कशी मिळते, असा सवाल करत आमच्या सणांना १० दिवसांसाठी परवानगी मिळते. असेही ते म्हणाले. अनधिकृत मशिदीवर भोंगे लावण्याची परवानगी मिळाल्यास हनुमान चालिसा लावणार. कुणीही धार्मिक रंग दिला तर आम्हीही त्‍याच भाषेत उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT