Latest

मोठी बातमी: महाराष्ट्रातील शेवटच्या टाडा प्रकरणात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष, बांधकाम व्यवसायिक सुरेश दुबे खून प्रकरण

अमृता चौगुले

पुणे, प्रतिनिधी: चौतीस वर्षापूर्वी बिल्डर सुरेश दुबे यांच्या झालेल्या खून प्रकरणी भाई ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील यांची महाराष्ट्रातील शेवटच्या टाडा खटल्यात निर्दोष झाली आहे. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा निकाल दिला. यापूर्वी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सहा जणांना जन्मठेप सुनावली आहे. 34 वर्षापूर्वी नालासोपारा रेल्वे स्थानकावर दुबे यांचा खून झाला होता.

या प्रकरणात विशेष सरकारी वकील सतीश मिश्रा यांनी काम पाहिले. तर बचाव पक्षाच्या वतीने ऍड. सुदीप पासबोला,ऍड. सुधीर शहा, ऍड. रोहन नहार, ऍड. प्री तेश खराडे, ऍड. सचिन पाटील, ऍड. रोहित तुळपुळे यांनी काम पाहिले. तर दिवंगत जेष्ठ विधी तज्ञ श्रीकांत शिवदे यांनी देखील या खटल्यात काम पाहिले होते.

SCROLL FOR NEXT