Latest

लोकसभा निवडणुकीचा आजपासून तिसरा टप्पा; 11 लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील तिसर्‍या टप्प्यास शुक्रवार, 12 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असून, येथे 7 मे रोजी मतदान होणार आहे.

सातारा, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद (धाराशिव), बारामती व रायगड या 11 मतदारसंघांत ही निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. यापैकी लातूर व सोलापूर हे दोन मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. शुक्रवार, 12 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे या 11 जागांवर लोकसभा निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात येईल व यासोबतच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

द़ृष्टिक्षेपात तिसरा टप्पा

एकूण जागा : 11, अधिसूचना जारी होण्याचा दिनांक : 12 एप्रिल, उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस : 19 एप्रिल, अर्जांची छाननी : 20 एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस : 22 एप्रिल. मतदानाचा दिवस : 7 मे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.