रायगड : पुढारी वृत्तसेवा : मुरूड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस मंगळवारी रात्रीपासून गुजरातचे एक जहाज समुद्रात अडकले होते. आज सकाळी हे जहाज मोरे गावाच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारणपणे एक किलोमीटरच्या अंतरावर आढळून आले. दरम्यान, जहाजातील पाचही खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले असून सर्वजण सुखरुप आहेत.
जहाजातील कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसहित मुरूड प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला, अशी माहिती मुरूडचे तहसिलदार रोहन शिंदे यांनी दिली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे हे मुरूडच्या तहसिलदारांच्या संपर्कात असून वेळोवेळी माहिती घेत आहेत.
हेही वाचलंत का ?