पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मी कॅप्टन होतो, नंतर कॅप्टन नव्हतो आणि पुन्हा कॅप्टन झाला आहे. हा जीवनाचा भाग आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच घडेल असे नाही. हा खूप चांगला अनुभव आहे. मी टीम इंडियाचा कर्णधार झालो आहे. तसेच अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे, गेल्या महिनाभरातही मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांत रोहित शर्माने मुंबईत इंडियन्सचे कर्णधारपद गमावल्यावर अप्रत्यक्ष भाष्य केले. निमित्त होते टी-20 विश्वचषक संघ निवडीनंतरच्या पत्रकार परिषदेचे. यावेळी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर उपस्थित होते.