पुढारी ऑनलाईन डेस्क : सुदीप्तो सेनचा चित्रपट द केरल स्टोरी सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. पण पश्चिम बंगाल सरकारने चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घातलीय. आता सुप्रीम कोर्टाने द केरल स्टोरीच्या निर्मात्यांच्या याचिकेवर पश्चिम बंगाल सरकारला नोटिस बजावली आहे. ज्यामध्ये राज्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्य़ात आले आहे.
"हा चित्रपट देशभर प्रदर्शित होत आहे, पण पश्चिम बंगाल सरकारने चित्रपटावर बंदी का घातली, तुम्ही तो का चालवू नये? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. हा चित्रपट देशाच्या विविध भागांमध्ये सुरु आहे. याचा चित्रपटाच्या सिनेमॅटिक मूल्यांशी काहीही संबंध नाही, तो चांगला किंवा वाईट असू शकतो," असे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजीर्जी यांनी राज्यात शांतता राहावी, य़ासाठी द केरल स्टोरीच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. याविरोधात चित्रपट निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली होती.