सातारा; पुढारी वृत्तसेवा : एस. टी. महामंडळाच्या विलीनीकरणाची आवई शरद पवार यांनीच उठवली. इतरांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची त्यांची सवय आहे. सातार्यातसुद्धा त्यांनी हेच केले. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस आहेत. या व्हायरसचा प्रसार थांबला पाहिजे, अशी जोरदार टीका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी केली.
अॅड. गुणरत्न सदावर्ते हे एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत एस. टी. कष्टकरी पॅनेलच्या प्रचारासाठी बुधवारी सातार्यात आले. यावेळी त्यांनी सातारा बसस्थानकात चक्क बुलेटवर पत्नीसह फेरफटका मारला. यावेळी सातारा बसस्थानकातील कर्मचार्यांशी संवाद साधला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अॅड. सदावर्ते म्हणाले, महाराष्ट्रात सर्व वर्गात मागासलेपणा आहे. त्यासाठीच ईडब्ल्यूएसची तरतूद आहे. शरद पवारांनी त्यातही राजकारण केले. ज्या गोष्टी देणे शक्य नाही ते देण्याची आशा दाखवली. हा सर्व प्रकार म्हणजे त्यांच्या राजकारणाचा भाग होता.