करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोच्या ताज्या भागात अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि अक्षयकुमार आले होते. या भागाची प्रचंड चर्चा सोशल मीडियात, नेटकर्यांमध्ये झाली. यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना समंथाने सर्वांनाच धक्का दिला. घटस्फोट अवघड होता खूप, पण आता सर्व ठीक आहे. मी आता पूर्वीपेक्षा जास्त खंबीर झाले आहे. नागा आणि माझ्यात आताही एकमेकांबाबत तीव्र भावना आहेत. जर आम्हा दोघांना एकाच रूममध्ये बंद केले गेले तर आधी तुम्हाला त्या रूममधील चाकू, धारदार वस्तू लपवाव्या लागतील. कारण काहीही होऊ शकते.
आता आमच्यात काहीही ठीक नाही, पण वेळेसोबत सर्व काही ठीक होईल, अशी आशा मला आहे. 250 कोटी रुपये पोटगीच्या अफवेवर देखील समंथाने खुलासा केला. ती म्हणाली की, मी पोटगी मागितलेलीच नाही. ही केवळ मनानेच रचलेली कहाणी आहे. ही सर्वात वाईट गोष्ट होती. मी रोज सकाळी उठले की विचार करायचे, इन्कम टॅक्सवाले येतील आणि त्यांना माझ्याकडे काहीच मिळणार नाही.