पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२ चा अर्थसंकल्प संसदेत नुकताच मांडला आहे. त्यामध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात क्रिप्टोकरन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार असल्याची घोषणा केली आहे, तर आरबीआयचं डिजिटल चलनही बाजारात येणार असल्याचीही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. डिजिटल चलन म्हणजे नेमकं काय, हे आपण जाणून घेऊया…
डिजिटल चलनासंदर्भात महत्वाची बाबी
१) डिजिटल चलन देशाच्या केंद्रीय बॅंकेकडून लागू केले जाते. या डिजिटल चलनाचा केंद्रीय बॅंकेच्या ताळेबंदीत समावेश असतो.
२) देशाच्या सार्वभौम चलनात त्याचे रुपांतर केले जाते, हे त्याचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल रुपयादेखील म्हणून शकतो.
३) केंद्रीय सरकारद्वारे या चलनाला मान्यता मिळालेली असते. त्यामुळे डिजिटल चलनात कोणत्याही धोका असत नाही.
४) केंद्रीय बॅंकेची मान्यता असल्यामुळे डिजिटल चलनाद्वारे आपण बाजारात खरेदीसाठीही वापरू शकतो.
५) डिजिटल चलनाचे मूल्य हे स्थिर असते. त्यात चढ-उतार येत नाही. हे डिजिटल चलन देशाच्या मुद्रा चलनातही बदलता येते.
हे वाचलंत का?