Latest

पंतप्रधानांविरोधात बोलणार्‍यांना ‘ईडी’ कार्यालयात बसावे लागते : राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्‍लाबोल

नंदू लटके

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा: जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याविरोधात बोलताना त्‍यांना ५५ तास सक्‍तवसुली संचालनालयाच्‍या ( ईडी ) कार्यालयात बसावे लागते; पण मी पंतप्रधानांनी सांगू इच्‍छितो की, ५५ तास, ५०० तास किंवा पाच वर्ष माझी चौकशी करा, मला ईडीचे भय वाटत नाही, अशा शब्‍दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (दि. ४) हल्‍लाबोल केला. वाढत्‍या महागाईच्‍या निषेधार्थ आज दिल्‍लीतील रामलीला मैदानात काँग्रेसच्‍या वतीने 'महागाई पे हल्‍लाबोल' सभेत ते बाेलत हाेते.

यावेळी राहुल गांधी म्‍हणाले, "आज विरोधी पक्षाला आपली भूमिका मांडणे अत्‍यंत कठीण झाले आहे. संसदेत मोदी सरकार आम्‍हाला बोलू देत नाही. देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. त्‍यामुळेच समाजात वेगाने घृणाही पसरत आहे. जप आणि राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ देशात घृणा निर्माण होईल असे वातावरण निर्माण करत आहेत,यामुळे देश कमकुवत होत आहे."

देशातील १० ते १५ श्रीमंत उद्‍योगपती स्‍वप्‍न पाहू शकतात. मात्र देशातील गरीबांना ही संधी नाही. हा देश उद्‍योगपतींचा नाही तर गरीबांचा आहे. देशात केवळ दोनच उद्योगपतींना फायदा मिळत आहे. भाजप या दोन उद्योगपतींसाठीच काम करत आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

केवळ काँग्रेस पक्षच देशाला वाचवू शकताे

देशात नवीन तीन कृषी कायदे हे उद्योगपतींच्‍या फायदासाठी आणण्‍यात आले हाेते. शेतकर्‍यांनी केलेल्‍या आंदोलनामुळे सरकारला हे कायदे मागे घ्‍यावे लागले. आज देशातील सर्वसामान्‍य जनता संकटात आहे. देशातचे मोठे नुकसान होत आहे. ७० वर्षांच्‍या काँग्रेस सरकारच्‍या कार्यकाळात एवढी महागाई कधीच दिसली नाही. केवळ काँग्रेस पक्षच देशाला वाचवू शकतो, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT