Latest

देशाने ७० वर्षात कमावले ते ८ वर्षात गमावले; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : देशात लोकशाहीची हत्या सुरू आहे. सरकारविरोधात बोलले तर कारवाई सुरू होते. देशात ईडीची दहशत सुरू आहे. सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य नाही. बेरोजगारी महागाई वाढत आहे. पण सरकारला हे मान्यच नाही. संयुक्त राष्ट्रांना देखील खोटे ठरवण्यापर्यंत सरकारची मजल, देशाने 70 वर्षात कमावले ते भाजपने 8 वर्षात गमावले. अशा टिकेसह राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

स्टार्ट अप इंडिया कुठे आहे? देशातील महागाईचे आकडे सरकारला दिसत नाही का? असे प्रश्न त्यांनी सरकारला विचारले. तसेच मी कुणाला घाबरत नाही. असेही ते म्हणाले. सत्य बाहेर आणतो म्हणून माझ्यावर कारवाई केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशाची जनतेचे या सर्व घडामोडींकडे लक्ष आहे.

दिल्लीत काँग्रेसकडून चलो राष्ट्रपती भवन असा मार्च काढण्यात येणार होता. या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत. या पार्श्वभूमिवर राहुल गांधी यांची नेते अशोक गहलोतसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT