पुढारी ऑनलाईन: ऑपरेशन अजय अंतर्गत भारताचे चौथे विमान 274 भारतीय नागरिकांना घेऊन इस्रायलहून परतले आहे. ते आज (दि,१५) सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Operation Ajay)
नुकत्यात भारतात दाखल झालेल्या विमानामधील, इस्रायलमधून परतलेला एक भारतीय नागरिक म्हणतो, "सुरुवातीला ते भयंकर होते. सर्व काही अनियंत्रित होते. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकार आणि लष्कर खूप कडक कारवाई करत आहेत. भारत सरकारने पुढाकार घेत ऑपरेशन अजय राबविले आणि इस्रायलमधील नागरिकांना सुखरूप बाहेर काढळ्या बद्दल धन्यवाद दिले.
इस्रायलमधून परतलेल्या भारतीय नागरिक प्रिया गुप्ता म्हणतात की, "मी गेल्या दोन वर्षांपासून तेल अवीव विद्यापीठात होते. भारतीय दूतावासानेही पाठिंबा दिला होता. रत सरकारने इस्रायमधील अडकलेल्या भारतीयांना जलद भारतात आणले. ही व्यवस्था केल्याबद्दल मी भारत सरकारची आभारी आहे. भा