जेजुरी(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : सोमवती अमावस्येनिमित्त सोमवारी (दि. २०) सकाळी ७ वाजता जेजुरी गडावरून पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. यावेळी हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करून भंडाराची उधळण केली.
पहाटे २ वाजल्यापासून भाविकांनी देवदर्शनासाठी जेजुरी गडावर रांगा लावल्या होत्या. सुमारे २ लाख भाविक गडावर दाखल झाले आहेत. देवसंस्थान तसेच श्री खंडोबा पालखी सोहळा समितीच्या वतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले होते.