पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी अन्नामलाई अण्णाद्रमुकशी युती करू इच्छित नाही. आम्ही आमच्या नेत्यांची ही सर्व टीका सहन करायची का?, असा सवाल करत भाजपसोबत आमची युती नाही. निवडणुकीवेळी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते डी जयकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी एन अन्नादुराई आणि जयललिता यांच्यावर भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी टीका केली होती. यानंतर अण्णाद्रमुक आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे कार्यकर्ते दिवंगत मुख्यमंत्र्यांचा कोणताही अपमान सहन करणार नाहीत, असे डी जयकुमार यांनी म्हटले आहे.
भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी अन्नामलाई अण्णाद्रमुकशी युती करू इच्छित नाही. आम्ही आमच्या नेत्यांची ही सर्व टीका सहन करायची का? आम्ही तुम्हाला साेबत का घेऊन? भाजप येथे पाय ठेवू शकत नाही, असे जयकुमार यांनी म्हटले आहे.
आम्ही यापुढे आमच्या नेत्यांवर टीका सहन करू शकत नाही. सध्या तरी भाजप आणि अण्णाद्रमक यांच्यात कोणतीही युती नाही. भाजप अण्णाद्रमुकसोबत नाही. याबाबतचा निर्णय निवडणुकीच्या वेळीच घेतला जाईल, अशी ही आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.