Latest

जरांगेंना नारायणगडच्या मठाधिपतींकडून बळजबरीने पाणी पाजण्याचा प्रयत्न, पण…

मोहन कारंडे

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : नारायणगडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना समाजाच्या तीव्र भावना असल्याने बळजबरीने पाणी पाजण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांना दोन घोट पिल्यानंतर प्रचंड त्रास झाला. त्यांच्या तोंडातून ते पाणी बाहेर आले. पोटात आग पडली असे ते पुटपुटत होते.

मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज गुरुवारी सहावा दिवस असून त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. "पाटील पाणी तरी घ्या…" अशी आर्त विनवणी आंदोलनक जरांगे यांना करत आहेत. मात्र जरांगे सकाळपासून उठलेले नाहीत. जरांगे यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी आज सकाळी १० वाजता आरोग्यपथक आले, मात्र तपासणीसाठी त्यांनी नकार दिला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT