कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लक्षतीर्थ वसाहतीत दोन तरुणांवर झालेल्या हल्ला प्रकरणी विजयसिंह उर्फ रिंकु वसंतराव देसाई (वय 40, रा. बोंद्रेनगर) आणि त्याचा साथीदार नितेश तानाजी वरेकर (वय 26, रा. शिंगणापूर ता. करवीर) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 16) पहाटे अटक केली.
राजकीय वर्चस्व आणि डिजिटल फलक फाडल्याच्या कारणातून झालेल्या तलवार हल्ल्यात दोघे जण जखमी झाले होते याप्रकरणी यापूर्वी बारा जणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक झाली होती. रिंकू देसाई आणि वरेकर दोघे पसार झाले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम राबवली. मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता.
आज (दि. 16) पहाटे चिकोडी तेथे त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष जाधव, पोलिस उपनिरीक्षक इक्बाल महात यांच्या पथकाने ही कारवाई केली.