उत्तूर : पुढारी वृत्तसेवा : उत्तूर (ता.आजरा) येथील वृषाली संतराम कांबळे हिने यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये ३१० वी रँक घेऊन आयएएस झाली. वृषालीने आयएएस होण्यासाठी परिस्थितीशी सामना करीत जीवतोड मेहनत घेतली. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी व पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश संपादन केले आहे. वृषालीने पॉलिटिकल सायन्स घेऊन बी.ए पूर्ण केले आहे. मुंबई येथील सेंट झिविअर्स कॉलेज येथे तिचे शिक्षण झाले आहे. वृषालीचे मूळ गाव उत्तूर असून त्यांचे वडील कामानिमित्त नेरूर येथे राहतात.
हेही वाचा