पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता कार्तिक आर्यनचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात. (Kartik Aaryan ) त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. चित्रपट दोस्ताना २ मुळेही तो चर्चेत होता. पण दोस्ताना २ च्या सेटवर करण जोहरशी वाद झाला, या मुद्द्यावर कार्तिकने स्पष्टीकरण दिलं आहे. कार्तिक आर्यनला करण जोहरचा चित्रपट दोस्ताना २ मधून अचानक बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याची चर्चा झाली. या चित्रपटाच्या काही भागाचे शूटिंगही त्याने शूट केले होते. परंतु, करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्या दरम्यान सर्वकाही ठिक झालं नाही. त्यामुळे या चित्रपटातून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. (Kartik Aaryan )
कार्तिक आर्यनने करण जोहरच्या वादावर सोडले मौन
कार्तिक आर्यनवर आरोप लागला होता की, तो अनप्रोफेशनल आहे. कार्तिक आर्यनला करण जोहरशी वादाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्याने या वादावर मौन सोडले. करणने चित्रपट दोस्ताना २ मधून बाहेर का काढलं? यावर 'आप की अदालत'मध्ये कार्तिक आर्यनने स्पष्टीकरण देत म्हटलं की, हे काही दिवसांआधीच घडले आहे. परंतु, या वादावर मी कधी बोललो नाही. माझ्या आईने मला शिकवलं आहे की, हे माझे संस्कारदेखील आहेत की, जेव्हा दोन लोकांमध्ये भांडण होते, तेव्हा जो लहान असतो, त्याने मध्ये बोलू नये. यासाठी मी कधीच याविषयी बोललो नाही.'
जेव्हा त्याला विचारण्यात आले की, अधिक पैशांची मागणी केल्याने चित्रपट सोडावा लागला का? यावर कार्तिक आर्यन म्हणाला, 'या गोष्टी चायनीज कुजबुज असल्याप्रमाणे आहेत. असं काहीच नाही. मी पैशांच्या कारणामुळे चित्रपट सोडला नाही. मला लोभ आहे. पण, कहाणींचा, पैशांचा नाही.' त्याने हेदेखील सांगितलं की, चित्रपटामध्ये काही बदल करण्यात आले होते, जे त्याला आवडले नव्हते.
कार्तिक आर्यनने पुढे हेदेखील म्हटलं की, त्याचे आता करण जोहरशी चांगले नाते आहे. त्याने त्याचा चित्रपट शहजादाच्या ट्रेलरसाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. तो लवकरच आशिकी -३ मध्ये दिसणार आहे. तो 'फ्रेडी' मध्ये दिसला होता. फ्रेडीमध्ये अलाया फर्नीचरवालाची मुख्य भूमिका होती.