पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsSL 3rd ODI : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज (15 जानेवारी) तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत तिसरा एकदिवसीय सामना जिंकून पाहुण्या संघाला व्हाईट वॉश देण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 पासून सुरू होईल.
या सामन्यानंतर भारतीय संघाला 72 तासांपेक्षा कमी कालावधीत वनडेमध्ये न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयाने खेळाडूंचा आगामी मालिकेसाठी आत्मविश्वास दुणावेल. दुसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंवरील वर्कलोड मॅनेज करण्याच्या गरजेवर भर दिला. अशा स्थितीत या तिसऱ्या वनडेत काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. (INDvsSL 3rd ODI)
सलामीवीर इशान किशन आणि मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय फलंदाजीत संधी मिळू शकते. तिसर्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा प्लेइंग-11 काहीही असो, पण अव्वल पाच फलंदाजांना गोलंदाजांसाठी अनुकूल ग्रीनफिल्ड स्टेडियमवर श्रीलंकेच्या गोलंदाजीविरुद्ध अधिक फलंदाजी करायला आवडेल, ज्यामध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्याचाही समावेश आहे. (INDvsSL 3rd ODI)
भारत 14 दिवसांत 50 षटकांचे सहा सामने खेळणार आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवरील कामाचा ताण हा भारतीय संघ व्यवस्थापनासाठी निश्चितच चिंतेचा विषय ठरणार आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान भारतीय आक्रमणाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. म्हणूनच त्यांच्या कामाचा भार सर्वाधिक विचारात घेतला जाईल. त्यामुळे गोलंदाजी क्रमवारीतही काही बदल होऊ शकतात. (INDvsSL 3rd ODI)
शमीच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा संघात समावेश केला जाऊ शकतो. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल राहिल्यास अर्शदीपला खूप फायदा होऊ शकतो. दुसरीकडे, दुखापतग्रस्त युजवेंद्र चहलच्या जागी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला दुसऱ्या वनडेत मैदानात उतरवण्यात आले होते. चहल तंदुरुस्त झाल्यास कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला आहे. 2019 साली झालेल्या त्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध नऊ विकेट्सने विजय मिळवला होता. या मैदानाची परिस्थिती आल्हाददायक आणि फलंदाजीला अनुकूल आहे. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी धावसंख्या उभारायची आहे. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर तिरुअनंतपुरममध्ये सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
नुवानिडू फर्नांडो, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित अस्लंका, धनंजय डिसिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेल्लालेगे, लाहिरू कुमारा, कासुन राज