पुढारी ऑनलाईन डेस्क : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर २ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला १६२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ १६० धावांवर गारद झाला. वर्षाच्या सुरूवातीलाच श्रीलंकेला मात देत भारतीय संघाने विजयाचा श्रीगणेशा केला. टीं-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम मावीने प्रभावी मारा करत ४ षटकात २२ धावा देत ४ गडी बाद केले. (IND vs SL)
भारताकडून उमरान मलिकनेही मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. श्रीलंकेचा कर्णधार शनकाला ४५ धावांवर बाद करत मोलाची कामगिरी बजावली. या विकेटमुळे भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत केली.
तत्पूर्वी, श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताची अवस्था ५ बाद ९४ धावा होती. यावेळी, दीपक हुड्डाने नाबाद ४१ धावांची झुंजार खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात मदत केली. त्याने अक्षरसोबत सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूत नाबाद ६८ धावांची भागीदारी रचली यामुळे भारताने २० षटकात ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून इशान किशननेही ३७ तर कर्णधार हार्दिक पांड्याने २९ धावांचे भर घातली.
भारताकडून फलंदाजी करताना इशान किशनने नेहमी प्रमाणे आक्रमक फलंदाजी केली. टी-२० सामन्यात पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलने आपली धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात ७ धावाकरून बाद झाला. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला श्रीलंकेच्या तीक्षणाने आपल्या फिरकीवर बाद केले. यानंतर फलंदाजी करण्यासाठी सुर्यकुमार यादव मैदानात उतरला. त्याने देखील आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी केली. परंतु, तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. सामन्यातील ६ व्या ओव्हरमध्ये कलात्मक शॉट मारण्याच्या नादात तो राजपक्षेला सोपा कॅच देऊन बाद झाला. त्याला करुणारत्ने ७ धावांवर बाद केले. (IND vs SL)
सामन्याच्या सातव्या षटकात संजू सॅमसनला जीवनदान मिळाले. या संधीचा फायदा घेऊन संजू मोठी धावसंख्या उभी करेल असेल वाटत होते. परंतु, त्याला या संधीचा फायदा घेण्यात यश आले नाही. त्याने चाहत्यांची पुन्हा निराशा केली. त्याला धनंजयने ५ धावांवर बाद केले. पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारताची धावसंख्या ३ बाद ४७ होती.
संजू सॅमसन बाद झाल्यानंतर त्याच्या जागी कर्णधार हार्दिक पांड्या मैदानात उतरला. सुरूवातील त्याने आणि इशानने सावध भूमिका घेत फलंदाजी केली. यानंतर पुन्हा धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात इशान किशन २९ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. सामन्याच्या अकराव्या षटकात त्याला हसरंगाने धनंजयकरवी झेल बाद केले.
सामन्याच्या पंधराव्या षटकांत कर्णधार पांंड्या २९ धावा करून बाद झाला. त्याला मधूशंकाने मेंडिसकरवी झेलबाद केले. पांंड्या बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी आक्रमक खेळी करत संघाला शंभर धावांचा टप्पा पार करून दिला. यावेळी गोलंदाजी करताना हसरंगा, धनंजया, करूणारत्ने, तीक्षणा आणि मधुशंका यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद करत भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.
यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १६० धावांवर गारद झाला. यामध्ये कर्णधार शनाकाने झुंजार खेळी करत संघाला विजयी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला भारताच्या उमर मलिकने ४५ धावांवर बाद करून सामन्यावर भारतीय संघाची पकड मजबूत केली. यानंतर मेंडिस, करूणारत्ने आणि हसरंगा यांनी आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यात यश आले नाही. त्यांमुळे श्रीलंकेचा सामन्यात २ धावांनी पराभव झाला.
हेही वाचा;