वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : गेल्या 8 वर्षांत वर्षाला 8.30 लाख रुपयांवर कमाई करणार्या भारतीयांची संख्या अडीच पटीने वाढली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांमुळे हे शक्य झाले असल्याचेही या अहवालात म्हटलेले आहे. हाच वेग कायम राहिला, तर येत्या 3 वर्षांतच ही संख्या 10 कोटींवर जाईल, असा निष्कर्ष जागतिक बँकिंग समूह 'गोल्डमन सॅच'ने आपल्या एका ताज्या अहवालातून काढला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस प्रगती करीत आहे आणि भारतीयांची समृद्धीही वाढते आहे. येत्या काही वर्षांत हे प्रमाण झपाट्याने वाढणार आहे. आगामी 3 वर्षांत भारतातील समृद्ध लोकांची संख्या 10 कोटी झालेली असेल.
भारतीयांच्या समृद्धीची कारणे
'गोल्डमन सॅच'च्या या समृद्ध भारत अहवालानुसार, गेल्या दशकात अर्थव्यवस्थेत वेगाने झालेली वाढ, स्थिर चलनविषयक धोरण आणि पतवृद्धीचे चढे प्रमाण, यामुळे भारतीयांची भरभराट झाली आहे.
पुढे काय? : भारतात श्रीमंत लोकांची लोकसंख्या जसजशी वाढत जाईल, तसतशी चैनीच्या वस्तूंना मागणीही वाढेल.
दरडोई उत्पन्नाचे आव्हान : भारताचे दरडोई उत्पन्न सध्या सुमारे 2,100 डॉलर म्हणजेच वार्षिक 1.74 लाख रुपये आहे. ते वाढविण्याचे आव्हान आगामी काळात असेल.
8 वर्षांत अडीच पटीने श्रीमंतवृद्धी
2015 मध्ये भारतात 2.4 कोटी लोक वार्षिक 8.30 लाख रुपयांपेक्षा जास्त कमवत होते.
2023 मध्ये ही संख्या 6 कोटी झाली आहे. याचाच अर्थ गेल्या 8 वर्षांत ही संख्या संख्या अडीच पटीने वाढली आहे.