चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
आज कोणतेही काम करण्यापूर्वी पूर्व नियोजन केल्यास चुका टाळता येतील. मुलांच्या करिअरशी संबंधित
सकारात्मक माहितीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर किंवा निष्कारण चर्चेत वेळ घालवून करिअरकडे दुर्लक्ष करु नये. संतुलित आहारासोबत व्यायामाकडेही लक्ष द्या, असा सल्ला श्रीगणेश देतात.
श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या धैर्याने प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. महिला वर्गासाठी आजचा दिवस अनुकूल असेल. लाभामुळे ऊर्जा मिळेल. अनोळखी लोकांवर ठेवलेला विश्वासामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समतोल आव्हानात्मक असेल. व्यवसायात तुमच्या संपर्कातील व्यक्तीशी मधुर संबंध ठेवा.
तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्ही सकारात्मक परिणाम प्राप्त कराल.उधार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी काळ अनुकूल आहे. बेकायदेशीर कामांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांनीही करमणूक आणि चुकीच्या कामात गुंतून अभ्यास आणि करिअरशी तडजोड करू नये, अशी सूचना श्रीगणेश करतात. नोकरदार वर्गासाठी आज कामाचा भार अधिक असेल. कौटुंबिक परिस्थिती आनंदी राहू शकते. रक्तदाबाशी संबंधित समस्या असणार्यांनी काळजी घ्यावी.
आज वैयक्तिक हितसंबंधांपेक्षा तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. आर्थिक बाबतीत कोणावरही माहिती न घेता विश्वास ठेवू नका. व्यवसायानिमित्त असणारी संबंध अधिक दृढ करा. घरातील वातावरण आनंदी राहील.
मागील काही काळापासून सुरू असलेल्या समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, असे श्रीगणेश सांगतात. मित्रांचा सहवास लाभेल. विद्यार्थी आणि तरुण स्पर्धेत बाजी मारतील. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. रागावर नियंत्रण ठेवा. व्यापार आणि व्यवसायात परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल.
गणेश म्हणतात की, कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. इतरांवर ठेवलेला अंधविश्वास तुमच्यासाठी नुकसानकारक ठरेल. भविष्यातील कोणतीही योजना बनवताना निर्णयाला प्राधान्य द्या. कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांशी समन्वयामुळे कामाचा वेग वाढेल. बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते, याची जाणीव ठेवा.
आज करमणुकीशी संबंधित कामांमध्ये वेळ जाईल. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचा वाद सोडवण्यासाठी योग्य वेळ आहे. आपली दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे, निष्काळजीपणामुळे महत्त्वाचे काम चुकू शकते. मुलांच्या वर्तनांकडे दुर्लक्ष करु नका. व्यवसायात तुमच्या कामाशी संबंधित नियोजनाची अनोळखी व्यक्तीबरोबर चर्चा करु नका.
श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. बदलत्या वातावरणामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या रुटीनमध्ये केलेले बदलाचा सकारात्मक परिणाम दिसेल. पैसे उधार घेण्याशी संबंधित व्यवहार करू नका. दुसर्यांच्या कामात जास्त ढवळाढवळ करणे योग्य नाही. नोकरदार व कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल.
आत्मविश्वासाच्या बळावर ध्येय साध्य करु शकाल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेल्या भेटीमुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. काही नवीन योजनांचा गांभीर्याने विचार करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. उत्पन्नासोबतच खर्चही जास्त होईल. खूप घाईमुळे कोणतेही काम बिघडू शकते. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला व्यवसायात उपयुक्त ठरेल. कुटुंबीयांसोबत खरेदीत वेळ व्यतित कराल.
श्रीगणेश म्हणतात की, तुमच्या नेहमीच्या कामांपेक्षा वेगळे काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. मत्सरामुळे काही लोक तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही विषयावर निर्णय घेताना घरातील अनुभवी आणि खास लोकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणत्याही प्रकारचे व्यवसाय कर्ज घेऊ नका.
घरगुती सुखसोयींसाठीच्या खरेदीत आज वेळ व्यतित कराल. अध्यात्माशी संबंधित कामांमध्ये विशेष रुची राहील, असे श्रीगणेश सांगतात. वारसाशी संबंधित कोणतेही प्रकरण अडकले असेल तर ते कोणाच्या तरी हस्तक्षेपाने सोडवण्याची योग्य वेळ आहे. मित्रांसोबतचे संबंध खराब करू नका. तुमचे एखादे रहस्यही उघड होण्याची शक्यता आहे. मानसिक शांती मिळवण्यासाठी धार्मिक ठिकाणी थोडा वेळ व्यतित करा. कार्यक्षेत्रात घाई न करता गांभीर्याने आणि सावधगिरीने काम करण्याची गरज आहे.
श्रीगणेश म्हणतात की, मुलांना करिअर संदर्भात चांगली बातमी मिळाल्याने आनंद होईल. घरी पाहुणे येतील. लाभदायक प्रवासाचे योगही आहेत. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. काहीवेळा विनाकारण तुमच्या मनात अशांतता आणि तणाव जाणवेल. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ व्यतित करा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका.