पुढारी ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेशमधील इटानगरच्या नाहरलगुनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 700 हून अधिक दुकाने जळून खाक झाल्याची घटना आज (दि.२५) घडली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग कशामुळे लागली. याचे नेमके कारण समोर आलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या 2 तासांत केवळ 2 दुकानांना आग लागली. परंतु ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला अपयश आले. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.