मुंबई : पुढारी वृत्तसेवा – पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी दिले आहेत.
हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल, देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. शशिकांत वारिसे प्रकरणाच्या तपासाचा आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सर्वबाजूंनी केला जात आहे.