पुढारी ऑनलाईन: माझे मित्र आणि सहकारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
गेल्याच आठवड्यात आमदार मुक्ताताई टिळक आपल्यातून निघून गेल्या आणि आज आमदार लक्ष्मण जगताप. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली आहे. महापौर आणि आमदार म्हणून त्यांनी विकासाच्या प्रक्रियेत मोठे योगदान दिले. तसेच विधानभवनात पीपीई कीट घालून त्यांचे मतदानाला येणे आणि त्यावेळी अत्यंत प्रेमाने मला दिलेली हाक, मी कधीच विसरू शकणार नाही. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. मन सुन्न आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.