पुढारी ऑनलाईन डेस्क: आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर अनेक देशांमध्ये होवू लागला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे अनेक जटील समस्या सोडवणे मानव जातीला सुकर होत आहे. त्यामुळे याच्या तोट्यांपेक्षा फायद्याची चर्चा सध्या होताना दिसते. मात्र एक रिपोर्टनुसार, AI टूल्स एक दिवस जगभरात वीज संकटाचे कारण बनू शकते. यामुळे पर्यावरणावर हाेणार्या परिणामाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
जगभरातील अनेक देश विचेच्या संकटाचा सामना करत आहेत. भारतातही उन्हाळ्याच्या दिवसात वीज संकटाला सामोरे जावे लागते. मागील काही दिवसांपासून जगातील अनेक देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर केला जात आहे. एका अहवालानुसार, OpenAI चे लोकप्रिय AI चॅटटूल ChatGPT दर तासाला 5,000 किलोवॅट वीज वापरत आहे. हा वापर फक्त 200 दशलक्ष वापरकर्त्यांच्या दैनंदिन विनंतीवर होत आहे. विनंत्यांची संख्या वाढली तर वापर देखील वाढू शकतो. सरासरी काढल्यास, ChatGPT सरासरी अमेरिकन घरापेक्षा 17,000 पट जास्त वीज वापरत आहे.
डेटा सायंटिस्ट ॲलेक्स डी व्रीज यांच्या मते, AIचा जगभर वापर वाढल्यास उर्जेचा निचरा आणखी वाढू शकतो. गूगलने प्रत्येक शोधात जनरेटिव्ह एआय समाविष्ट केले तर ते दरवर्षी सुमारे 29 अब्ज किलोवॅट वीज वापरू शकते. हा वापर केनिया, ग्वाटेमाला आणि क्रोएशिया सारख्या संपूर्ण देशांच्या वार्षिक विजेच्या वापरापेक्षा जास्त असेल. तुलनेने, जगातील काही सर्वाधिक वीज-केंद्रित व्यवसाय अंदाजित AI वापरापेक्षा कमी आहेत.
प्रत्येक एआय सर्व्हर आधीपासून ब्रिटनमधील डझनभर घरांइतकीच वीज वापरत आहे, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी एआयच्या एकूण वीज वापराचा अंदाज लावला आहे. पारदर्शकतेच्या अभावामुळे जगासमोर विजेचे संकट निर्माण होवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांमध्ये जगातील अनेक देशांमध्ये AI विविध उद्योगांमध्ये आपला ठसा निर्माण केला आहे. मात्र पर्यावरणाचा विचार करत त्याच्या उर्जेच्या वापराकडे लक्ष देणे अत्यावश्यक ठरणार असल्याचेही व्रीज यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :