नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने भ्रष्टाचारविरोधी कारवाईच्या नावाखाली आम आदमी पक्षाला चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप 'आप' नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ( दि.१८ ) केला. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
केंद्रातील मोदी सरकारकडून आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांना तसेच नेत्यांना विविध प्रकरणांत अडकवले जात असल्याचे सांगत केजरीवाल पुढे म्हणाले की, गेल्या काही काळात अनेक नेत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आम आदमी पक्षाची गुजरातमधील वाढती लोकप्रियता पाहवत नसल्याने व गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने 'आप' नेत्यांना प्रताडीत केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार हिरेन जोशी यांनी अनेक दूरचित्रवाहिन्यांचे मालक तसेच संपादकांना 'आप'ला कव्हरेज न देण्यासाठी धमकावले असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने जर आम आदमी पक्षाला प्रसिद्धी देण्यात आली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा दम जोशी यांनी भरला असल्याचेही केजरीवाल म्हणाले.
हेही वाचा :