Latest

Bihar Hajipur Accident : बिहारमध्ये भीषण अपघात; १५ जणांचा दुर्दैवी अंत

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : Breaking News : बिहार मधील वैशाली जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका ट्रक भरधाव येत लोकांना चिरडले आहे. यात १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पंधरा पैकी सात मुलांचा समावेश आहे. जखमींचा अधिकृत आकडा आलेला नाही. ही घटना हाजीपूर-महनार ( Bihar Hajipur Accident ) मार्गावर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सुलतानपूर गावात झाला.

Bihar Hajipur Accident : मृतात पंधरा पैकी सात मुलांचा समावेश

सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील हाजीपूर-महनार ( Bihar Hajipur Accident ) मार्गावर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सुलतानपूर गावात हा भीषण अपघात झाला. हा अपघात रविवारी (दि.२०) रात्री ९ च्या सुमारास झाला. हाजीपूर-महनार महामार्गाजवळ  स्थानिक देवता भुमिया बाबाची पुजा करण्यासाठी बरीच गर्दी जमली होती.  त्याच दरम्यान ट्रकवरील निंयत्रण सुटल्याने भरधाव ट्रक त्या गर्दीतून जात एका झाडाला जावून धडकला. यात गर्दीतील बरेच लोक चिरडले. अस सांगण्यात आले आहे की, ट्रक चालक नशेमध्ये होता. यात १५ जणांचा दुर्दैवी मृर्त्यू झाला. यात सात लहान मुलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती समजताच च स्थानिक आरजेडी आमदार मुकेश रोशन यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी शोक व्यक्त केला आहे. तर नितीशकुमार यांनी अपघातग्रस्तांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकार कडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत  जाहीर केली आहे. ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार आहे.

मृतांचा आणि जखमींचा आकडा अजुन अधिकृत आलेला नाही. अपघातग्रस्तांना मदत सुरु आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT