मुरादाबाद : 22 रोजी अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापित होतील तेव्हा या तारखेला जर कुणाकडे बाळ जन्मले तर त्यानिमित्त किन्नर गातील, नाचतील, पण पैसे मागणार नाहीत. यजमान स्वखुशीने देतील, ते घेऊ, पण हट्टाला पेटणार नाही, असे किन्नर गुरू माँ अलबेली यांनी सांगितले.
त्रेता युगात भगवान श्रीरामाच्या जन्मानंतर किन्नरांनी राजा दशरथाकडून हट्टाने बक्षिसी मिळविली होती. तेव्हापासून कुणाकडे बाळ जन्मले, की किन्नर घरी पोहोचतात. गातात, नाचतात व इतकेच हवे म्हणून पैसे मागतात. किन्नरांनी त्रेतायुगात बाळ रामाला कडेवर घेऊन तेव्हा ढोलकीवर अभिनंदन गीत गायले होते. 22 नंतर दर्शनाचा संकल्पही करूला भागातील 200 किन्नरांनी सोडलेला आहे.