पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने हादरले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली आहे. आज रविवारी (दि.2) अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे डबल इंजिनचे सरकार ट्रिपल इंजिन सरकार झाले आहे. त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल. याचा महाराष्ट्राला मोठा फायदा होईल," असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :