Latest

देशात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : President Draupadi Murmu : देशात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू झाले असून अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले विशेष स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस देशवासियांना संबोधित करताना राष्ट्रपती बोलत होत्या.

देशाच्या विकासामध्ये महिला मोठे योगदान देत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, आज आपल्या महिलांनी अशा अनेक क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे ज्यात त्यांच्या सहभागाची काही दशकांपूर्वी कल्पनाही केली जात नव्हती.आपल्या देशात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष लक्ष दिले जात आहे हे पाहून मला आनंद होत आहे. (President Draupadi Murmu)

आर्थिक सक्षमीकरणामुळे महिलांचे कुटुंब आणि समाजातील स्थान मजबूत होते. मी सर्व देशवासियांना महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. आमच्या बहिणी आणि मुलींनी सर्व प्रकारच्या आव्हानांना धैर्याने सामोरे जावे आणि जीवनात पुढे जावे, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले. आमचे सरकार कठीण प्रसंगांना तोंड देण्यास सक्षम आहे. महागाई हा चिंतेचा विषय आहे, पण आपल्या सरकारने त्यासाठीही प्रभावी पावले उचलली आहेत. (President Draupadi Murmu)

भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. गरजूंना मदत करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. गेल्या दशकात लोकांना गरिबीतून बाहेर पडणे शक्य झाले आहे, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले. त्याचप्रमाणे जात, पंथ, भाषा, प्रदेश याशिवाय आपली एक ओळख आपल्या कुटुंबाशी आणि कार्यक्षेत्राशी निगडित आहे.

परंतु, आपली एक ओळख आहे जी या सगळ्यांच्या वर आहे आणि ती म्हणजे आपली ओळख म्हणजे भारताचे नागरिक. 'आपण सर्व या महान देशाचे नागरिक आहोत. आपल्या सर्वांना समान संधी आणि अधिकार आहेत आणि आपली कर्तव्ये देखील समान आहेत, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.संपूर्ण जगात विकासाची उद्दिष्टे आणि मानवतावादी सहकार्याला चालना देण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जी २० च्या अध्यक्षपदाद्वारे जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असल्याने भारतासाठी जागतिक प्राधान्यक्रमांना योग्य दिशेने नेण्याची ही एक अनोखी संधी आहे.

देशाने आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित केले आहे आणि जीडीपीमध्ये प्रभावी वाढ नोंदवली आहे. भारताची अर्थव्यवस्था केवळ कठीण काळातच सक्षम नाही तर इतरांसाठीही आशेचा स्रोत बनली आहे. वंचितांना प्राधान्य देणे हे आमच्या धोरणांचे आणि कृतींचे केंद्रस्थान आहे. परिणामी, गेल्या दशकात मोठ्या संख्येने लोकांना गरिबीतून बाहेर काढणे शक्य झाले आहे, असेही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT