Latest

Lok Sabha Election : चौथ्या टप्प्यात राज्यात 298 उमेदवार निवडणूक रिंगणात

अनुराधा कोरवी

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 369 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 71 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 298 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची संख्या : नंदुरबार 11 , जळगाव 14, रावेर 24, जालना 26, औरंगाबाद 37, मावळ 33 , पुणे 35, शिरुर 32, अहमदनगर 25, शिर्डी 20, बीड 41 अशी आहे. या 11 मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT