काठमांडू; वृत्तसंस्था : नेपाळच्या बारा जिल्ह्यांत गुरुवारी जेन झी आंदोलक पुन्हा रस्त्यावर उतरले, ज्यामुळे सलग दुसर्या दिवशी तणाव निर्माण झाला. सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर परिस्थिती अधिकच चिघळली.
सिमारा येथे अशांतता वाढत असल्याने, बुधवारी तरुण आणि - कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने दुपारी 1.00 ते रात्री 8.00 या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे सहायक मुख्य जिल्हा अधिकारी छबिरामन सुबेदी यांनी सांगितले.
5 मार्च 2026 रोजी होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते जिल्ह्याच्या दौर्यावर येणार असल्याने बुधवारपासून बारा येथील तणाव वाढत आहे. या अशांततेमुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबरमधील उठावानंतर शेकडो कैदी अद्याप फरार आहेत आणि तितकीच शस्त्रे गहाळ झाल्याने सुरक्षेची स्थिती नाजूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.