टोकियो; (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
जपानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, भारत आणि जपान यांच्यातील हा एक प्रमुख प्रकल्प असून काही वर्षांतच प्रवासी सेवा सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे. भारतात 7,000 किलोमीटर लांबीचे हाय स्पीड रेल्वेचे जाळे उभारण्याच्या भारताच्या मोठ्या महत्त्वाकांक्षेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
भारत आणि जपान ‘चांद्रयान-5’ मोहीम एकत्र मिळून राबवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. इस्रो आणि जपानची अंतराळ संस्था ‘जाक्सा’ (जेएएक्सए) यांच्यात या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेसाठी सहकार्य होणार आाहे,अशी माहिती मोदी यांनी दिली.