पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळमध्ये महापूर आणि भूस्खलनातील मृतांचा आकडा ३९ झाला असून, १८ जण बेपत्ता आहेत. नेपाळच्या पश्चिम भागाला पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे आणि सर्वाधिक जीवितहानी याच भागात झाली आहे, अशी माहिती नेपाळ गृह मंत्रालयाचे प्रवक्ता शंकर प्रसाद कोईराला यांनी दिली आहे. ( Nepal floods) दरम्यान, भारताच्या उत्तराखंड राज्याची सीमा असलेल्या नेपाळच्या पश्चिम भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे.
महाकाली नदीला आलेल्या पुरात दारचुला जिल्ह्यात तब्बल १२२ घरे वाहून गेली आहेत.पश्चिम नेपाळमधील जाजरकोट जिल्ह्यातील किमान सहा नेपाळी तरुण पुरात वाहून गेले आहेत. महाविद्यालयीन परीक्षा संपवून ते नोकरीसाठी भारतात जात होते.दरम्यान, भारताच्या उत्तराखंड राज्याची सीमा असलेल्या नेपाळच्या पश्चिम भागाला जोरदार तडाखा बसला आहे.