Latest

India vs Australia : भारताच्या विजयाचा 5 देशांना झटका

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत आगेकूच केली आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 70.83 आणि भारताची 61.67 झाली आहे.

भारताच्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे; मात्र श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला अजूनही डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. गुणतालिकेत श्रीलंका तिसर्‍या आणि दक्षिण चौथ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया कसे पात्र होऊ शकते

डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे फक्त तीन सामने बाकी आहेत. तथापि, नागपूर कसोटीत भारताने कांगारूंचा दारुण पराभव केला असला तरी, डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे, पण जर कांगारूंना भारताने 4-0 ने क्लीन स्विप दिला तर त्यांच्या विजयाची टक्केवारी 59.64 होईल, पण जर पुढील तीनपैकी एका कसोटीत विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 64.9, तर अनिर्णीत राहिल्यास 61.40 अशी होईल. अशातच त्यांना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. पुढील आठवड्यापासून ही मालिका सुरू होणार आहे.

द. आफ्रिकेची शक्यता कमीच

भारताच्या विजयाने चौथ्या क्रमांकावर असलेल्या द. आफ्रिकेच्या संधी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. 28 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजचा द. आफ्रिका दौरा सुरू होईल, पण भारताचा आणखी एक विजय द. आफ्रिकेला फायनलच्या शर्यतीतून बाहेर काढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT