पुढारी ऑनलाइन डेस्क : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या संपूर्ण भारतवासियांना खूप-खूप शुभेच्छा असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधन सुरू केले आहे. दिल्ली लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करीत आहे.
यावेळी स्वातंत्र्यासाठी प्राण देणा-या सर्व महापुरुषांचे स्मरण केले. हा स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांना स्मरण करण्याचा दिवस आहे. तसेच राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नमा आदि महान स्त्रीयांचा उल्लेख खरत भारताची स्त्रीच्या त्याग आणि बलिदानाला नमन केले.
भारत लोकशाहीची जननी आहे
75 वर्षांमध्ये देशावर अनेक संकटे आली
राष्ट्रध्वजासाठी अनेकांनी बलिदान केले
महात्मा गांधीच्या अंत्योदयाच्या संकल्पनेला समर्पित तळागाळाच्या लोकांना समर्थ करण्याच्या गांधीजींच्या स्वप्नासाठी स्वतःला समर्पित केले आहे
हे पुनर्जागरणाचे पर्व, देशाची सामूहिक चेतना हीच देशाची ऊर्जा
देशवासियांचे सामर्थ्य राष्ट्रध्वजाने दाखवले
आझादीच्या इतक्या वर्षानंतर विश्वाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
विश्व भारताकडून मोठ्या अपेक्षा बाळगतो
हे परिवर्तन 75 वर्षांच्या वाटचालीचे परिणाम आहे
मी याला त्रिशक्तीच्या रुपात पाहतो
गेल्या तीन दिवस देश तिरंगामय झालय
राजनितीक स्थिरतेचे काय महत्व आहे, हे भारताने दाखवले.
सबका साथ सबका विकास या विचारात देशवासियांनी त्यांच्या सामर्थ्याने आणखी रंग भरले
पूर्ण ताकदीने देशाची आगेकूच सुरू
देशाला खूप मोठे संकल्प घेऊन चालावे लागेल
पंचप्राण जागृत करावे लागेल हे पंचप्राण 5 मोठे संकल्प असतील
विकसित भारत
गुलामीच्या बेड्या अंतर्मनातून तोडणे
आपल्या वारशावर अभिमान असायला हवे चिर पूरातन नित्य नूतन या संस्कृतीवर गर्व असायला हवे
एकभारत श्रेष्ठभारतसाठी एकता आणि एकजूटतेची भावना वाढील लावणे
नागरी कर्तव्यांचे पालन करणे
देशासाठी पुढची 25 वर्षे महत्वाची विकसित भारत म्हणून देशाचा विकास व्हावा
नवीन शैक्षणिक धोरण गुलामीतून मुक्ती देईल
विश्व देशाच्या योग आणि आयुर्वेदाकडे अभिमानाने पाहतो
विविधता हीच भारताची शक्ती
कुटुंब व्यवस्था ही भारताची ताकद
कोणत्याही कृतीतून नारीचा अपमान होणार नाही, असा संकल्प घ्या
नारीचा गौरव ही राष्ट्राची खूप मोठी पूंजी
सरकारची जबाबदारी आणि नागरी कर्तव्य योग्य पार पडले तर दोन्ही गोष्टी एक सोबत चालल्या तर निश्चितच विकसित भारत, प्रगत भारताचे लक्ष्य पूर्ण करू
स्वदेशीतून स्वराज्य स्वराज्यातून सुराज्य हे आपल्याला अस्तित्वात आणायचे आहे
कोरोना काळात लसीचा विक्रम
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पहिल्यांदा स्वदेशी तोफांची राष्ट्रध्वाजाला सलामी ही गर्वाची बाब
आत्मनिर्भर भारत योजनेत लष्कराचे मोठे योगदान
भारत मॅन्यूफॅक्चरिंग हब बनत आहे देश वेगाने प्रगती करत आहे
वंदे भारत ट्रेन विश्वासाठी आकर्षण
सेंद्रिय नैसर्गिक शेती आत्मनिर्भर भारताला ताकद देणारी
रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहे
आम्हाला भारताच्या सामर्थ्यावर विश्वास आहे.
आपल्या ७५ वर्षाचा अनुभव आहे आहे. ऑप्टीकल फायबरमध्ये सुद्धा आपण काम केले आहे. देशाच्या ७५ वर्षात प्रवासात नारी शक्तीचे मोठे योगदान
आरोग्य, पोलीस, खेळाचे मैदान किंवा सुरक्षा व्यवस्था असो अशा अनेक क्षेत्रात महिलाशक्ती आपल्याला पाहिला मिळत आहे. ही महिला शक्तीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण शक्ती या देशाच्या मुली आणि महिलांसाठी लावणार आहोत. डिजिटल क्रांतीचे
येत्या 25 वर्षात अनेक मोठे संकल्प आहेत. विकसित भारत हा पहिला संकल्प आहे.
भ्रष्टाचार आणि घराणेशाही या देशातील मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे आम्हाला या गुलामगिरीपासून मुक्तता पाहिजे.