पणजी; पुढारी वृत्तसेवा : सरकारी कर्मचार्यांनी यापुढे कामचुकारपणा केल्यास त्यांना सक्तीने निवृत्त करून घरी पाठवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतलेला आहे. तसे निर्देश सर्वसाधारण प्रशासन विभागाकडून (जीएडी) जाहीर केले आहेत. त्यामुळे कामावर असताना खासगी कामे करणार्या, अनुपस्थित असताना अधिकार्यांच्या मर्जीने उपस्थिती दाखवणार्या तसेच कामात निष्काळजीपणा करणार्यांवर आता कारवाई होऊ शकते. त्यांना थेट घरी पाठवले जाईल किंवा सक्तीची निवृत्ती घेण्यास भाग पाडले जाणार आहे.
सचिवालयाच्या जीएडी कार्यालयाने त्याबाबत मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की कार्यालयीन कर्तव्ये, अवज्ञा, वारंवार उशिरा येणे आणि निष्काळजीपणा करणारे कर्मचारी असतात. त्यातील काही कर्मचारी वर्तन सुधारण्यास तयार नसतात. त्यामुळे अशा कर्मचार्यांची बदली करावी म्हणून सचिवालयात विविध खाते विभागांकडून अनेक विनंत्या जीएडीला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी कोणत्याही सरकारी कर्मचार्याला सेवानिवृत्त करण्याचा अधिकार देणार्या एफआर 56 (जे) हे कलम लागू करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल खराब किंवा कोणतीही कामगिरी न दाखवणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येणार आहेत. ही कारवाई जबरदस्तीची सेवानिवृत्ती घेणे किवा घरी पाठवणे अशी असू शकते, असे या अधिसूचनेत म्हटले आह