पणजी : पुढारी वृत्तसेवा
अलीकडे पडलेल्या मुसळधार पावसामुळे साळावली धरण १०८ टक्के भरले आहे, तर पंचवडी आणि गवाणे धरण १०१ टक्के भरले आहे. सध्यास्थितीत सर्वात कमी पाणी (६६ टक्के) चापोली धरणात आहे. गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरण ८५ टक्के भरले आहे.
पावसाने दडी मारल्याने राज्यातील धरणे भरतात की, नाही अशी शंका निर्माण झाली होती. भविष्यातील पाणीटंचाईचे चित्र डोळ्यांसमोर येत होते. मात्र, पावसाने दमदार हजेरी लावली आणि ३ धरणे ओव्हरफ्लो झाली. आता पाणी टंचाईची झळ बसणार नाही, उन्हाळ्यातही पाणी पुरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यातील धरणांची स्थिती...