‘सागरमाला’मुळे जलमार्ग वाहतुकीस गती, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास  Pudhari photo
गोवा

‘सागरमाला’मुळे जलमार्ग वाहतुकीस गती, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास

‘सागरमाला’मुळे जलमार्ग वाहतुकीस गती, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास

पुढारी वृत्तसेवा

पणजी : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी सागरमाला योजना राज्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेंतर्गत राज्यात बंदर विकास आणि जलमार्ग वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

दिल्लीत केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय ागरमाला शिखर समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, किनारी राज्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते, मुख्यमंत्री महणाले, सरकारने सागरमाला अंतर्गत्त विविध प्रकल्प सुरू केले आहेत, जसे की अंतर्गत भागातील पर्यटन आणि दैनंदिन जलप्रवास वाढविण्यासाठी बंदरांचे आधुनिकीकरण आणि जेट्टींचे बळकटीकरण केले आहे.

या व्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कल्पना केल्याप्रमाणे, बंदरांशी जोडलेले औद्योगिकीकरण निर्यातीद्वारे बंदर नेतृत्व विकासाची क्षमता उघड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. किनारी समुदाय विकास हा एक महत्त्वाचा केंद्रबिंद आहे, ज्यामध्ये कौशल्य वाढ, सामाजिक आणि आर्थिक समावेशन आणि आर्थिक वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत, तसेच रो-रो सेवा आणि वॉटर मेट्रो सारख्या नवीन मागांचा शोध देखील घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT