मडगाव : पुढारी वृत्तसेवा : घड्याव्हाळ खड्डे (कुंकळी, दक्षिण गोवा) येथे झालेल्या भीषण अपघातात काजूबियांची वाहतूक करणारा ट्रक पुलाचा कठडा तोडून पन्नास मीटर खोल नदी पात्रात पडल्याची घटना शनिवारी (दि.१६) रात्री घडली.
या अपघातात किमान सहा जण मृत्युमुखी पडल्याची शक्यता असून तेरा जणांना उपचारासाठी मडगावच्या जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुले, महिला आणि वृध्दांचा समावेश आहे. बचावकार्यादरम्यान एका महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. तर सुमारे आठ वर्षे वयाच्या मुलीला गंभीर जखमी अवस्थेत गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री सुमारे साडेअकराच्या दरम्यान घडली असून ट्रकमध्ये काजू बिया भरलेल्या होत्या.