पणजी : पुढारी वृत्तसेवा
जलस्रोत विभागाने ३० जून रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मान्सूनच्या पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. या जलाशयांपैकी, साळावली धरणात ५८०.२५ मिमी पावसाची नोंद झाली.
पाण्याची पातळी ३१.६५ मीटरवर पोहोचली आहे. धरणातील पाणीसाठा ७,३५९ हेक्टर मीटर म्हणजेच त्याच्या ३१.४ टक्के झाला आहे. अंजुणे धरणात सर्वाधिक ६८३.२० मिमी पावसाची नोंद झाली, तर त्याचा पाणीसाठा ४९१.५० हेक्टर मीटरवर म्हणजे ११ टक्केवार पोहोचला आहे.
आमठाणे धरणात ५२० मिमी पावसाची नोंद झाली असून पाणीसाठा ५५.९ टक्केवर, तर चापोली धरण क्षेत्रात ६४६.२० मिमी पाऊस पडला असून पाणीसाठा ४८ टक्केवर पोहोचला आहे. दिवसभरात पावसाची नोंद न होऊनही, गवाणे धरण ५५.४ टक्के, तर ५६५.०४ मिमी पावसानंतर पंचवाडी धरण २३.५ टक्के भरले आहे. दरम्यान, तिलारी धरणात ५०५.६० मिमी पावसाची नोंद झाली असून धरणात २६.४१ टक्के पाणी साठा झाला आहे.