विठ्ठल गावडे पारवाडकर
पणजी :
महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जातीयवाद वाढत आहे आणि तो विकासाला मारक ठरणार आहे. याची जाणीव सर्वच राजकीय नेत्यांनी ठेवावी व जातीयवादाला खतपाणी न घालता जनसेवेचे व विकासाचे राजकारण करावे. असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ व रस्ता खात्याचे मंत्री नितिन गडकरी यांनी केले.
आज ताळगाव पणजी येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये गडकरी बोलत होते. त्याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे , इतर मंत्री, आमदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना गडकरी यांनी सांगितले की विकसित भारताप्रमाणे गोवाही विकसित झालेला आहे .आपण गोव्याला येत्या पाच वर्षांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची कामे करणार आहे . त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ६ हजार कोटी रुपये खर्च करून रिंग रोड बांधला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशाचा भारीव विकास करत आहे. नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी लोकांच्या गरजा समजून घ्याव्यात व त्यांचे निकरन करावे . तरच जनता मताच्या रूपामधे आशीर्वाद देईल. असेही गडकरी म्हणाले. फायनान्शियल ऑडीट नको तर फरफोर्मन्स ऑडीटला महत्त्व द्यावे. असेही गडकरी म्हणाले.