file photo 
Latest

चाळीसगावच्या कन्नड घाटात भाविकांच्या वाहनाला अपघात, चौघे ठार

गणेश सोनवणे

पुढारी ऑनलाइन डेस्क ; चाळीसगाव येथील कन्नड घाटात देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. गाडी थेट दरीत कोसळली असून या अपघातामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या अपघतात तर ७ जखमी झाले आहेत.

या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीसह दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर सात जण जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कन्नड घाटातून जात असतांना एमएच ४१ व्ही ४८१६ या क्रमांकाच्या तवेरा गाडीचा अन्य वाहनासोबत जोरदार अपघात झाला. या भीषण अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के, (वय -६५); शिलाबाई प्रकाश शिर्के, (वय -६० ) ; वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी, (वय -३५) आणि पूर्वा गणेश देशमुख, (वय -०८) हे चार प्रवासी जागीच मयत झाले. एमएच ४१ व्ही ४८१६ ने अक्कलकोट दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना कन्नड घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. दाट धुके आणि अंधार यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट दरीत कोसळून हा अपघात झाला.

या अपघातात गणेश देशमुख,वय ३०; अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०); कृष्णा वासुदेव शिर्के, (वय -४); जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी,( वय १७ ); सिध्देश पुरुषोत्तम पवार( वय १२ ) ;.पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय -३५) आणि अभय पोपटराव जैन, (वय ५०) हे सात जण जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर, वाहनधारकांनी कन्नड घाटातून अतिशय सुरक्षितपणे वाहने चालविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT